हा पुरस्कार अन्य पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या सोबतच प्रा. डॉ. यादव यांनाही के. एस. आय. पब्लिकेशन संस्था आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी संयुक्तपणे लोकमान्य टिळक ग्रंथालय , वाई (जि.सातारा) येथील दिनांक ७ जून २०२६ रोजी आयोजित केलेल्या ‘५ व्या राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलनात’ निमंत्रित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष मा. नागनाथ श्रीपती डोलारे (नवीन पनवेल ), उद्घाटक मा. श्री. विलास धोंडीराम खरात , स्वागताध्यक्ष मा. शशिकांत कोचळे (वाई), संमेलनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कवी सरकार मा. श्री. विलास पाटील(इंगळी), मार्गदर्शक मा. डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील( घुनकी), लक्ष्यतारा न्यूज चैनलचे संपादक श्री. सचिन विष्णू वाघमारे (आटपाडी) इत्यादी निमंत्रित मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. तर सभा मंडपात महाराष्ट्राच्या पुणे, मुंबई, कोकण,गोवा, मराठवाडा, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर अशा विविध भागातून आलेले पुरस्कारप्राप्त साहित्यिक , संमेलनातील सहभागी कवी, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार प्रदान करताना. सोबत योगेश रामचंद्र यादव आणि त्यांच्या पत्नी सौ. ऐश्वर्या योगेश यादव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. विद्या थोरात-काळे (अंधेरी) व मा. दिपक पवार (रुकडी) यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले. शेवटी निमंत्रित प्रमुख पाहुणे, पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कवी संमेलनातील सहभागी कवी, पत्रकार आणि श्रोते या सर्वांचे मा. संमेलनच्या आयोजकांनी आभार मानले व संमेलनाची सांगता केली.