मराठा आरक्षणासाठी स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातूने केले मुं" />
मात्र, पूर्वीपासूनच शेती, पशुपालन व्यवसायाशी हा समाज निगडित असल्याने शिक्षण, नोकरीपासून तो वंचित राहिला. त्यात आरक्षणाचा लाभही त्यांना मिळाला नाही. त्यामुळे तो अतिमागास राहिला आहे. त्यामुळे मराठा व धनगर समाजाला कोणत्याही परस्थितीत आरक्षण मिळायला हवे, या लढ्यात मी अग्रभागी असेन अशी ग्वाही डॉ. देशमुख यांनी यावेळी समाजबांधवांना दिली.
यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत दत्तात्रय टापरे, दत्तात्रय जाधव, नारायण बापू गायकवाड, जोतिराम काटकर, गजेंद्र गायकवाड, हणमंत गायकवाड, रमेश चव्हाण, संजय शेटे व चैतन्य गायकवाड या तरुणांनी आपले मुंडण करून मराठा आरक्षणासाठी विलंब करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदवला.
मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत समाजातील शेकडो तरुणांनी आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या हा आपल्यापुढील पर्याय नाही. आपण सरकारशी लढून आपल्या हक्काचे आरक्षण मिळवू. आरक्षणाच्या लढाईत ज्या तरुणांनी आपले जीवन समर्पित केले आहे अशा समाज बांधवांच्या कुटुंबीयांना सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मदत करावी अन्यथा राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल.
- डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना.